

संजीव भांबोरे
भंडारा – (ऑल इंडिया प्रतिनिधी) जिल्ह्या पवनी तालुक्यातील चिचाळ( पात्री )येथील शांतीवन बुद्ध विहाराला मोठ्या संख्येने बौद्ध उपासक -उपासिका भिक्खू संघ मोठ्या संख्येने दर रविवारी भेट देतात. त्यामुळे या शांतीवन बुद्धविहाराचे महत्व वाढलेले आहे .या शांतीवन बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध ,डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्यदीप पुतळा ,शिवली बोधी यांच्या पुतळा ,अशोक स्तंभ, बोधी वृक्ष ,भिक्खू गण, उपासिका -उपासक यांना राहण्याची ,पिण्याच्या पाण्याची सुद्धा सुविधा आहे, त्याचप्रमाणे नैसर्गिक दृष्ट्या या ठिकाणी फुले झाडांची सुद्धा लागवड केलेली आहे. लहान मुलांना खेळण्याकरता गार्डन व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे . त्याचप्रमाणे भोजन व्यवस्था बौद्ध उपासक -उपासिका स्वतः या ठिकाणी तयार करतात.




