केन्द्रीय जलजिवन मिशन हर घर जल, हर घर जल ह्या योजनेच्या कामाची पाहणी…
भंडारा जिल्हा:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आष्टी गावात जलजिवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामाचे निरक्षण करिता भारत सरकार जलजिवन मिशन चे निर्देशक प्रदिप सिंग व त्यांच्या टीमने भंडारा जिल्ह्यातील आष्टी गावाच्या जलजिवन मिशन योजनेचा निरक्षण केले. यामध्ये ग्रामपंचायत चे सरपंच ईश्वर गौपाले, उपसरपंच प्रितीताई सोनवाने यांनी ग्रामपंचायत च्या पाणी पुरवठा च्या समस्या बद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की सध्या नल योजना अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत चालवत आहे परंतु बिजली बिल अत्याधिक येत असल्याने ग्रामपंचायत ला आर्थिक नुकसान सहन करावा लागतो. यासाठी या योजनेला सुरळीत चालविण्यासाठी सौर उर्जा संयंत्र मिळण्यात यावे.
ह्या जलजिवन मिशन तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नाकाडोंगरी, चिखला, येदरबुची (सुंदरटोला) , गणेशपुर, लोभी अशा अनेक गावात कामे कासवाच्या चालीने सुरु असुन ठेकेदार निस्कृष्ठ दर्जाची सामुग्री वापरुन सरकार ला लाखो रुपयांचा चुना लावत आहेत त्यामुळे केन्द्रीय निर्देशक मा.प्रदिप सिंग व त्यांच्या टीमने ह्या बाबीकडे लक्ष केंद्रित करुन पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद स्तरावरील पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना काम योग्य व गुणवत्ता पुर्वक व्हावे अशा सूचना देण्यात याव्या.

ह्या निरक्षण टीम मध्ये ग्रामीण जलापुर्ती विभागाचे कार्यकारी अभियंता विजय देशमुख, वरीष्ठ भूवैज्ञानिक चंन्द्रमनी ऊके, सहा. भूवैज्ञानिक योगिता बळगे, कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रियंका वाट, उप अभियंता बंसोड, तुमसर चे उप अभियंता बोन्द्रे, करंजेकर, गटारे, बघेले आणि सिरसाम होते.



