आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकार सुरक्षित आहे काय?

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा न्युज चॅनल
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा जिल्हा संपादकीय वार्ता :-प्राप्त माहितीनुसार आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात भारत देशातील पत्रकार सुरक्षित आहे काय? अशी शंका वाटत आहे.वेळोवेळी होणारे पत्रकारांवर हमले,धमक्या अशा अनेक परिस्थिती ला पत्रकाराला सामोरे जावे लागते.कधि-कधि तर आपला जीव धोक्यात ठेऊन बातमी संकलन करुन प्रकाशित करावे लागते.

बातमी प्रकाशित होताच अवैधरित्या धंदेवाईकांकडुन किंवा काही अधिकाऱ्यांकडून आपला जीव धोक्यात ठेवावा लागतो.त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने पत्रकारांच्या स्वरंक्षनासाठी काही कठोर नियम तयार करणे काळाची गरज आहे जेणेकरुन पत्रकारांवर होणाऱ्या हल्यावर आळा घातला येईल व “पत्रकार स्वरंक्षन कायदा ” चे कडेकोट पणे पालन होईल व कोणीही पत्रकारांशी अपमानजनक व्यवहार करु शकणार नाही व जानलेवा हल्ला करण्यास घाबरणार!




